Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016
"मन चिंब पावसाळी"... दीर्घकाळ प्रतीक्षा केलेला पाऊस सारे अडथळे पार करून अखेर एकदाचा येतो आणि कमालीच्या उन्हानं करपत चाललेलं आपलं काळीज ओलं-ओलं करून टाकतो . मग आत आत कुठंतरी जपून ठेवलेल्या कित्येक आठवणी ताज्या करीत आपल्या मनाची तिजोरी आनंदाने भरून टाकतो . आठवणींचे सारे कप्पे कधी तरी सवडीनं मी अलगद उघडून बघतो, तेव्हा ते समस्त निम्मे -अधिक पावसाच्या पाण्यानंच भरलेले असतात. .  करकरीत, निळा रेनकोट घातलेला तो शाळेचा पहिला दिवस , ओलेकच्च भिजलेले माझे केस आणि हात-पाय टॉवेलनं खसाखसा पुसणारी आई, आजीबरोबर फुलपात्रात वेचलेल्या गारा , ओल्या मातीचा खमंग वास, अळवाच्या पानांवर डुचमळणारा तो दंवबिंदू , काही क्षणच दिसून अकस्मात अदृश्य झालेलं इंद्रधनुष्य , शाळेभोवती साचलेलं डबकं, त्यात सोडलेल्या होड्या, एकमेकांच्या अंगावर उडवलेलं पाणी. .  हे सर्व आठवून मन गाऊ लागतं - " ए आई, मला पावसात जाऊदे ; एकदाच गं , भिजुनी मला; चिंब चिंब होऊदे !' पण तो निरागसपणा आता शक्य नाही. तारुण्यानं माझ्यातलं बाल्य कधीचंच हिरावून नेलंय. . पावसाचा आनंद घेण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. काही जण...